बकाल शहरे
वाढते शहरीकरण, शहरातील वाढती लोकसंख्या, शहरातील गरिबी, विषमता आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्यांनी महाराष्ट्राला वा भारतालाच नव्हे तर जगभरातील देशांना ग्रासले आहे. 10 लाखाच्यावर लोकसंख्या असलेली 26 शहरे आहेत. यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि पिंपरी-चिंचवड या 7 शहरांचा समावेश आहे. एकूण लोकसंख्या आणि झोपडपट्टीत राहणाऱयांची संख्या या निकषांवर देशात मुंबई शहराचा पहिला क्रमांक आहे.