ग्रामीण व विशेषतः शेतकरी कुटुंबांना अतिरिक्त उत्पन्न व आहाराच्या पोषण मुल्यात वृद्धी, असे दुहेरी फायदे मिळवून देणारा दुग्ध व्यवसाय हा महत्त्वाचा कृषिपूरक व्यवसाय आहे.
दूध उत्पादनामध्ये राज्याचा भारतामध्ये सहावा क्रमांक आहे. देशातील दूध उत्पादनामध्ये राज्याचा वाटा केवळ 6.65 टक्के आहे.
राष्ट्रीय पातळीवर दुधाची प्रति व्यक्ती प्रति दिन उपलब्धता 2890 ग्रॅम आहे. तर राज्यातील उपलब्धता केवळ 206 ग्रॅम आहे. देशाच्या तुलनेत राज्यातील उपलब्धता जेमतेम 71 टक्के आहे.